ठाणेकरांसाठी नवीन ३९ बसेस दाखल

ठाणे, 9 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

केंद्र सरकारच्या पूर्वीच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान अभियानातंर्गत ३९ मिडी बसेस आज ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या.

केंद्र सरकारच्या पूर्वीच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान अभियानातंर्गत ठाणे परिवहन सेवेसाठी   एकूण १९० बसेस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी १४० बसेस यापूर्वीच परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरित ५० बसेसपैकी ३९ बसेसची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आज त्या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. या सर्व बसेस मिडी बसेस आहेत.