राज्यातील धरणांचा पाणीसाठा 35 टक्क्यांनी वाढला

राज्यात 72 टक्के क्षेत्रावर पेरणी

मुंबई, 19 जुलै 2017/AV News Bureau:

गेल्या काही दिवसांत सतत कोसणाऱ्या मुसळधार पावसाने  राज्यातील धरणांमध्ये 34.74 टक्के साठा झाला आहे. तो गेल्यावर्षीच्या तुलनेत हा जलसाठा तीन टक्क्यांनी जास्त आहे. पाऊस असाच कोसळत राहीला तर पाण्याचा पुरेसा साठा होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.  राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रीय झाला असून 72 टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. लागवडीखालील क्षेत्रात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे असून त्याखालोखाल तेलबिया आणि तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे.

राज्यातील पर्जन्यमान

  • राज्यात 1 जून ते 19 जुलैअखेर 4 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या 73.9 टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या 108.5 टक्के एवढा झाला होता. पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी
  • ठाणे, रायगड, पालघर, पुणे, गडचिरोली या पाच जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस
  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, सातारा, सांगली, वर्धा, भंडारा, गोदिंया, चंद्रपूर या दहा जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस
  • धुळे, जळगांव,अहमदनगर, कोल्हापूर, नांदेड, बुलडाणा, वाशिम, अमरावती, नागपूर या नऊ जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के पाऊस
  • औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, अकोला, जालना, यवतमाळ या नऊ जिल्ह्यांत 26 ते 50 टक्के पाऊस
  • सोलापूर जिल्ह्यात 0 ते 25 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

धरणात 35 टक्के पाणी साठा

राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात 34.74 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 31.90 टक्के पाणी साठा होता.

जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे-

  • मराठवाडा-84 टक्के (3.1)
  • कोकण-31 टक्के (67.21)
  • नागपूर-68 टक्के (30.49)
  • अमरावती-31 टक्के (27.20)
  • नाशिक-04 टक्के (30.02)
  • पुणे-88 टक्के (39.93).

72 टक्के क्षेत्रावर पेरणी

  • राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस पीक वगळून) 64 लाख हेक्टर असून 14 जुलैअखेर 101.20 लाख हेक्टर क्षेत्रावर (72 टक्के) पेरणी झाली आहे.
  • कोकण, कोल्हापूर, पुणे विभागात भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. यामध्ये कापसाची ५३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून त्याखालोखाल तेलबिया (३१.६७ लाख हेक्टर) आणि तृणधान्याची (17.25 लाख हेक्टर ) पेरणी झाली आहे.