भाजप-रिपाइं युती सर्वांना पुरून उरेल

भाजप नेते रामशेठ ठाकूर  यांचा विश्वास

पनवेल,12 एप्रिल 2017/A News Bureau:

सबका साथ सबका विकास हेच भाजप आरपीआय युतीचे धोरण असून शेकाप,काँग्रेस,राष्ट्रवादी,समाजवादी व अन्य कितीही विरोधक एकवटले तरी भाजप आरपीआय युती सर्वाना पुरून उरेल असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कळंबोली येथे व्यक्त केला. विद्या मंगल गायकवाड यांच्या प्रभाग क्रमांक ७ येथील जनसंपर्क कार्यालयाच्या  उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कविता गायकवाड,कळंबोलीचे शहराध्यक्ष रविनाथ पाटील, बुधाजी ठाकूर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमर पाटील,प्रियांका पवार, यशवंत ठाकूर, अशोक मोटे, राज सदावर्ते, गोपीनाथ भगत, अमोल इंगोले, अमर ठाकूर, रश्मीत कौर, राजू बनकर, शंकरशेठ वीरकर, गोपीशेठ भगत यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.