भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या: रमेश चेन्नीथला

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदरमध्ये संपन्न

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई19 सप्टेंबर 2024

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदारएक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली आहे. नरेंद्र मोदी व आरएसएस विरोधात लढणारे देशातील ते एकमेव नेते असून राहुल गांधी भाजपासमोर मोठे आव्हान बनले आहेत त्यामुळेच घाबरलेला भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाचे नेते त्यांना सातत्याने  धमक्या देत असल्याचे  काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

हे वाचा : राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड: देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाप्रदेशाध्यक्ष नाना पटोलेविधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरातविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारविधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC मेंबर व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान आणि अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. 

हे वाचा : स्वयंघोषित शिल्पकाराने नवी मुंबईला लुटून खाल्ले- नाना पटोले

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले कीमहाराष्ट्रात आज काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहेविधानसभा निवडणुका मविआ एक होऊन लढणार आहे. कोकण विभागात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून या भागात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल व नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरवात महाराष्ट्रातून होईल असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की,केंद्र सरकारने देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले असताना राहुल गांधी यांनी 4000 किमीची पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलवून टाकले. देशाच्या संविधानासाठीलोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी ही यात्रा काढली. राहुल गांधी हे संयमी नेते आहेत पण भाजपा त्यांच्या जीवावर उठले आहेत्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाहीईंट का जवाब पत्थर से देंगेअसा इशारा पटोले यांनी दिला.

हे वाचा : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय क्रांतिकारक ठरतील-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले कीविधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिकानगरपालिकाजिल्हा परिषदेच्या निवडणुका होतीलत्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले कीमहायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहेऍम्ब्युलन्स खऱेदीत घोटाळा केला आहे. हे सरकार कमीशनखोरखोकेबाज,  धोकेबाज सरकार  असून या सरकारने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबईतील कोट्यवधी रुपयांची जागा अदानीला विकली जात आहे. भाजपा युती सरकारने महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे.

हे वाचा : भारतीय मराठा महासंघाच्या नवी मुंबई कार्यकारिणी जाहीर

========================================================

========================================================

 

========================================================