भारत जोडो यात्रेच्या वर्धापनदिनी राज्यभर पत्रकार परिषदा, पदयात्रा व जाहीर सभा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 6  सप्टेंबर 2023

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली होती. कन्याकुमारी ते काश्मीर या ४ हजार किलोमीटर पदयात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ७ सप्टेंबर  रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभरातील सर्व जिल्ह्यात भारत जोडो यात्रेचे आयोजन केले आहे.

७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत पदयात्रा काढली जाणार आहे व त्यानंतर ६ ते ७ या वेळेत जाहीर सभा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांपासून या भारत जोडो यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. त्याआधी दुपारी १ वाजता सर्व जिल्ह्यात काँग्रेसचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवून जनतेची कशी लूट केली याचा पर्दाफाश करणार असल्याचे काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांवर जिल्हावार जबाबदारी देण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूरनांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणअहमदनगरमध्ये विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातअकोलामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारपुणे जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणठाणे येथे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसिम खाननाशिकमध्ये CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरेकोल्हापूरमध्ये विधान परिषदेचे गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटीलऔरंगाबादमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटीलसोलापूरमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदेजळगावमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

========================================================

========================================================