निरंजन डावखरे विधानपरिषदेपुरते मर्यादीत

  • राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई,24 मे 2018:

निरंजन डावखरे हे जनाधार असलेले नेते आहेत असं मला वाटतं नाही. त्यांचं काम मर्यादीत विधानपरिषदेपुरतं होतं. त्यामुळे आमच्या पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

  • कै. वसंतराव डावखरे हे पक्षाचे नेते होते. ते १२ वर्ष विधानपरिषदेचे उपसभापती होते आणि त्यांचे चिरंजीवही विधानपरिषदेचे आमदार होते. म्हणजे घरातील मुलगा आणि वडिल यांना एकाच सभागृहात बसवण्याचा मान शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. मला वाटतं की, महाराष्ट्रातील कुठल्याच कुटुंबासाठी एवढी मदत, एवढा विचार कुठल्या पक्षाने केला नसेल. एवढी संधी काम करण्याची दिली असेल तर पक्ष बदलण्याची भावना तरुण वयात झाली असेल तर राजकीयप्रवास कोणत्या दिशेने जातोय हे लक्षात येत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
  • मास लिडर जे असतात ज्यांना जनाधार आहे. ते कधी पक्ष बदलण्याचा विचार सहजासहजी करत नाहीत. जनाधार नाही, कुठल्यातरी लाटेवर निवडून यायचं ठरलेले असतं, उद्दीष्ट आहे. ती माणसं पक्ष बदलत असतात. त्याने फार काही घडेल असं नाही आणि त्याने घाबरुन जायचं कारण नाही असं मला वाटतं. पक्षाला फार मोठा धक्का बसला आहे असंही नाही. अशा गोष्टी पक्षात होत असतात. विशेषत: पक्ष विरोधीपक्षात असतो त्यावेळी संधी शोधणारे प्रत्येक पक्षात असतात. ते इकडून-तिकडे करतच असतात. ज्यावेळी जनाधार असणारा माणूस जातो त्यावेळी मी याची काळजी करेन असेही जयंत पाटील म्हणाले.