11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस 29 जूनपर्यंत मुदत

मुंबई, 27 जून 2017/AV News Bureau:

अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेवून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत  29 जूनला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. मात्र २९ जूननंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्ज भरता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालकांनी एका निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठी धावाधाव सुरू झाली आहे. ऑनलाइन प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांना ताटकळत रहावे लागत आहे.27 जून ही ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्गातही तणावाचे वातावरण आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून शिक्षण विभागाने मुदत वाढवून दिली आहे.